Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. असं म्हणतात मृत्यू कधीच वेळ काळ पाहत नाही. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये राज्यात एकीकडे गणपतमी विसर्जनाच्या पवित्र सोहळा सुरु असून दुसरीकडे याला दुर्दैवी किनार लागली आहे. या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तेलंगणामध्ये बाप्पााला घेऊन जाताना विजेच्या तारांमध्ये बाप्पाची मुर्ती अडकली आणि जवळजवळ ५ ते ६ जणांना या विजेचा धक्का बसला. यावेळी काही जण मुर्तीला चिकटलेले दिसत आहेत तर काहीजण खाली कोसळलेले दिसत आहेत. यावेळी रस्त्यावर असणारी माणसं त्यांच्या मदतीसाठी पुढे जाताना दिसत आहेत. मात्र विजेच्या खांबावर स्फोट होताना दिसत आहे त्यामुळे लोकंही पुढे जायला घाबरत आहेत.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DOOK02-klcS/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mili.222324 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकानं म्हंटलंय, “देवा एवढा कसा रे निष्ठूर झालास” तर आणखी एकानं, “मृत्यू वेळ काळ बघत नाही” अशा अनेक प्रतिक्रिया लोक आता व्हिडीओवर देत आहेत