वसई: विरारमधील खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या चार मजुरांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट

हेही वाचा – एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे सांडपाणी प्रकल्प आहे. मंगळवारी चार मजूर प्रकल्पाच्या टाक्यांची साफसफाई करण्यासाठी उतरले होते. या टाक्या २५ ते ३० फूट खोल होत्या, मात्र त्यावेळी गुदमरून चार मजुरांचा मृत्यू झाला. यापैकी तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७) निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) अशी मृतांची नावे आहेत.