“आज परिघाबाहेरच्या माणसांची जगण्याची धडपड आणि या संघर्षात त्यांचं संपत जाणं ही कुणाच्या खिसगणतीत नसलेली गोष्ट झाली आहे. मग ते शेतकरी असोत, ऊस तोडणीचे मजूर असोत की गावोगावी स्थलांतर करीत हातावर पोट भरणारे असोत. संविधानानं दिलेला जगण्याचा अधिकारही असंख्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे समुहाच्या समुहं नष्ट होतात आणि त्यांची नोंदही कुठे नसते” अशा शब्दांत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री अनुराधा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.