राज्यातून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्य १९ ठिकाणांहून रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यांपैकी उत्तर प्रदेशला १८७, बिहारला ४४, मध्य प्रदेशला ३०, झारखंडला १५ व राजस्थानला १३ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अन्य ११ राज्यांतील मजुरांकरीता ही श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. काल (१९ मे) रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ४,२६,७७८ मजुरांसठी ३२० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ५१, लोकमान्य टिळक टर्मिनसहून ४५, पुण्याहून ३२, बोरिवलीहून २५, वांद्रे टर्मिनसहून २२ व पनवेलहून २१ गाड्या सोडण्यात आल्या. दरम्यान, मुंबई पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी शहरातील ९३ पोलीस स्टेशनमध्ये आजपासून मंत्रालयातील दीड हजार पोलीस कर्मचारी मदतीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.