मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. देशातील २८ पक्ष या बैठकीत सामिल होणार आहेत. आज (३१ ऑगस्ट) सायंकाळी ग्रँड हयात हॅाटेलमध्ये पहिली बैठक पार पडेल. संबंधित पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. लोकशाही आणि संविधानासाठी आम्ही लढत आहोत. देशातील जनता इंडियाबरोबर आहे, असं ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरेंनी एनडीएतून मित्रपक्षांना बाहेर ढकललं गेल्याचा आरोप भाजपावर केला आहे.