राज्य सरकारच्यावतीने आज (२० फेब्रुवारी) मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल शुक्रवारी सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. या अहवालावर विधीमंडळात चर्चा होणार आहे. त्याअनुषंगाने मराठा आरक्षणासाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार? विशेष कायदा पारित होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.