शहरांच्या विकासासाठी बनविण्यात येणाऱ्या आराखडय़ांतून खरोखरच काय साध्य होत? संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावणारा हा प्रश्न  वसई-उत्तन भागासाठीच्या विकास आराखडय़ामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास करीत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही आजची खरी कसोटी आहे. विकास हा माणसाच्या भल्यासाठी आहे. मात्र ज्याच्यासाठी हा विकास आहे तोच जर उद्ध्वस्त होत असेल तर विकासाच्या अवखळ वारूला अटकाव करणे आवश्यक आहे. मुंबई आणि तिच्या परिसरातील रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्य़ांसाठी महाराष्ट्र शासनाने एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) या प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. या संकल्पित आराखडय़ात वसई-विरार व मीरा-भाईंदरसह आठ महानगरपालिका व अंबरनाथपासून अलिबागपर्यंत ९ नगर परिषदांचा समावेश आहे. वसई, कल्याण, भिवंडी व पनवेल तालुके ग्रोथ सेंटर्स म्हणून दाखविले आहेत.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on city development plan
First published on: 08-01-2017 at 02:54 IST