केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार असून त्यादृष्टीने येत्या २० नोव्हेंबपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सीबीएसई शाळा, माध्यमिक शाळा प्रसिद्ध असून पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढाही याच शाळांकडे मुख्यत्वे असतो.
प्रतिष्ठा म्हणूनही दहावी आणि बारावीतील पाल्याने सीबीएसईच्या शाळेतून करावी, असा पालकांचा आग्रह असतो.
शाळेचा निकाल कायम ठेवण्यासाठी चांगले हुशार विद्यार्थी तयार होऊन शाळेचा नावलौकिक सतत असावा, असा शाळांच्या व्यवस्थापनाचा कल असतो. त्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास करण्याकडे शाळा लक्ष पुरवते. म्हणून काळानुरूप बदलण्यात सीबीएसई शाळा विश्वास ठेवतात.
सीबीएसई शाळांतील अनेक इयत्तांमध्ये गेल्यावर्षी बदल झाले आहेत. नववीच्या अभ्यासक्रमातील बदलाबरोबरच बारावीच्या ‘अकाउंन्टन्सी’ अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या अडचणी किंवा अभ्यासक्रम कशावर आधारित असावा यासाठी शिक्षकांकडूनच सूचना मागवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या बालसुलभ कल्पना, विचार लक्षात घेऊन त्यांना मोकळ्या वातावरणात अभ्यास करणे सोपे जावे यादृष्टीने अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी ठरतील, कोणते धडे विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी येतात, अडचणींचे स्वरूप, कोणते धडे वगळणे आवश्यक           आहेत, कोणते धडे शिकवायला अवघड आहेत, कोणता अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवल्यास त्यांच्या कोणत्या क्षमता वाढवण्यास मदत होईल, अशा विविधांगी सूचना शिक्षकांना विचारण्यात आल्या असून त्यांनी येत्या २० नोव्हेबंपर्यंत ंीं२ी३ऋ@ॠें्र’.ूे सूचना पाठवण्याचे आवाहन सीबीएसईच्यावतीने करण्यात आले आहे.
शिक्षकांकडून आलेल्या सूचनांवर सर्वागिण विचार करूनच अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्याधर्तीवरून शिक्षकांकडून सूचना मागवून अभ्यासक्रमात बदल घडवून आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यास बोजड वाटू नये, त्यांना हसतखेळत शिकता यावे आणि स्पर्धेच्या युगात त्याना टिकता यावे, यादृष्टीने काळानुरूप अभ्यासक्रम बदलण्याचे सीबीएसईचे धोरण स्वागतार्ह असल्याची माहिती एका नावाजलेल्या शाळेतील सूत्राने दिली.