शेतसाऱ्यामध्ये सवलत, सहकारी कर्जाचे रूपांतरण, वीजबिलात ३३.५ टक्के सवलत, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या अतिरिक्त सवलतीसह अंतिम पैसेवारीनंतर राज्य सरकारने दुष्काळ अधिकृतपणे जाहीर केला. मराठवाडय़ाच्या ५ जिल्ह्य़ांतील ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पैसेवारीच्या २ हजार ६१४ गावांमध्ये यासह दुष्काळाच्या सवलती लागू होणार आहे. याशिवाय छावणीतील जनावरांच्या खाद्यात ३ दिवस पेंड द्यावी, तसेच छावण्यांची देयके देताना त्यातून शेणाची रक्कम वजा करू नये, असेही नव्याने कळविले आहे.
सन २०१२ च्या खरीप हंगामात जिल्हाधिकाऱ्यांनी ५० पेक्षा कमी पैसेवारी घोषित केलेल्या ७ हजार ६४ गावांमध्ये टंचाई स्थिती जाहीर करण्यास शासन मंजुरी दिली. पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेली औरंगाबाद विभागातील गावे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद – १ हजार १७६, जालना ९७०, परभणी ३०, बीड ६८५ व उस्मानाबाद ४३८. पन्नासपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांतील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांची चालू वीजदेयके ३३ टक्के ग्रामपंचायतीने भरण्याच्या अटीस अधीन राहून ६७ टक्के (१७ टक्के मदत व पुनर्वसन व ५० टक्के पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल खर्चातून) भरण्यात येतील. या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावयाचा असून, त्यासाठी आवश्यक निधी संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
अडीच हजारांवर गावांमध्ये दुष्काळाच्या सवलती लागू
शेतसाऱ्यामध्ये सवलत, सहकारी कर्जाचे रूपांतरण, वीजबिलात ३३.५ टक्के सवलत, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या अतिरिक्त सवलतीसह अंतिम पैसेवारीनंतर राज्य सरकारने दुष्काळ अधिकृतपणे जाहीर केला. मराठवाडय़ाच्या ५ जिल्ह्य़ांतील ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पैसेवारीच्या २ हजार ६१४ गावांमध्ये यासह दुष्काळाच्या सवलती लागू होणार आहे.
First published on: 07-03-2013 at 02:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought concession applicable more then 2500 villages