पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर लातुरात बंदी घातली असली, तरी काही किरकोळ विक्रेते प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ात १ हजार १४१ व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी करून त्यांच्याकडून ४५ हजार ९०० रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला.
आयुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त आयुक्त शिवाजी िशदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त प्रदीप ठेंगर, स्वच्छता निरीक्षक एस. एस. राऊत, कर अधीक्षक ओमप्रकाश मुतंगे व आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या पथकाने भाजी-फळ विक्रेते, मांस विक्रेते, मेडिकल व इतर किरकोळ दुकानांची तपासणी केली. एक क्विंटल ६० किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. तपासणीची मोहीम यापुढेही चालू राहील. संबंधित विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी कळवले आहे. पोलीस कारवाई टाळण्यासाठी नागरिक व विक्रेत्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.