वध्र्यात प्रथमच अखिल भारतीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यास सहकारमहर्षी बापुराव देशमुख स्मृती सुवर्णचषक प्रदान करण्यात येणार आहे. अखिल भारतीय व राज्य खो-खो फे डरेशनची मान्यता लाभलेल्या या स्पर्धेचे आयोजक तुळजाई एज्युकेशन सोसायटी आहे. सोसायटीचे अध्यक्ष समीर देशमुख यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते, तर पुरस्कार वितरण गृहमंत्री आर.आर.पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होईल. देशभरातील पुरुष व महिलांचे ३० संघ सहभागी होत आहेत. या सर्व ४०० खेळाडू व ५० अधिकाऱ्यांच्या भोजन, निवास व प्रवासाचा खर्च संस्था करणार आहे. पुरुष व महिला गटात प्रत्येकी तीन प्रथम पुरस्कार, तसेच उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आहे. एकूण पाच लाखाचे पुरस्कार ठेवण्यात आले असून स्पर्धा आयोजनावर २५ लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. देशी खेळाच्या विकासासाठी संस्था कटिबध्द असून या अनुषंगानेच स्पर्धेचे आयोजन होत आहे. सहकारमहर्षी बापुराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्य बापुराव देशमुख स्मृती चषक देण्यात येईल. केसरीमल कन्या शाळेच्या पटांगणावर सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात स्पर्धा चालतील. आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, प.बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश, पुडूचेरी, नवी दिल्ली व राज्यातील काही संघाचे प्रवेश निश्चित झाले आहेत.