दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळी आणखी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाण्याची परिस्थिती भीषण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शहरातील वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात उद्या शुक्रवारी भूजलावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादाचा विषय ‘भूजल सर्वेक्षण व पुनर्भरण’ असा आहे. या परिसंवादात भूजल तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. यात प्राचार्य डॉ. एस. के. वडगबाळकर यांचे ‘भूजलाचा खडकाशी संबंध’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, तर डॉ. ए. बी. नारायणपेठकर ‘भूजल साठा व आधुनिक संशोधन’ या विषयावर मांडणी करणार आहेत. याशिवाय डॉ. बी. एस. पाटील (भूजल सर्वेक्षण व पुनर्भरण), डॉ. टी. पी. सावंत (पाणी हेच जीवन) यांचीही व्याख्याने होणार आहेत. या परिसंवादात शेतकऱ्यांचाही सहभाग राहणार आहे. निवडक २० शेतकऱ्यांच्या शेतातील भूजल संशोधन मोफत केले जाणार आहे. वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे व समन्वयक डॉ. पी. डी. माळी यांनी या परिसंवादाचे नियोजन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळी सोलापुरात आज भूजल सर्वेक्षणावर परिसंवाद
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळी आणखी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाण्याची परिस्थिती भीषण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शहरातील वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात उद्या शुक्रवारी भूजलावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 22-03-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today discussion on groundwater survey in drought solapur