ऊसदराचे आंदोलन पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांपाठोपाठ शिवसेनेनेही ऊसदरासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ नोव्हेंबरला कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या या आक्रमक पावित्र्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला असून त्यामुळे सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.