नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. Read More
पोलीस दलाकडून ऑनलाईन शेअर ट्रेडींगचे व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी जागरुकपणे ज्या गुंतवणूकदार कंपनीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करतोय त्याची खात्री कऱण्याचा सल्ला…
महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी शहरातील बांधकामांबाबत, तक्रार निवारणाबाबत एक समिती स्थापन करून त्याची एसओपी नियमावली करण्यात येणार असल्याचे लोकसत्ताला…
नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला स्थानकालगतच पिरॅमिड सेंट्रिया या नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरून आपल्या मुलाला शाळेतून…