पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकजण जखमी झाल्याची…
विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांकडून संमती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने तमिळनाडू, केरळ आदी राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
Stone Pelting on the Ram Navami procession : जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी सांगितलं की,…