क्रेडिट स्कोर चांगला असल्‍याने लोकांना अनेक फायदे होतो. तज्ञांच्या मते, क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास आर्थिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही आणि जेव्हा गरज असेल तेव्हा बँका किंवा वित्तीय संस्था सहजपणे गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सुवर्ण कर्ज देतात. तर, CRIF विक्रीचे प्रमुख सुभ्रांगशु चट्टोपाध्याय म्हणतात की, कर्जदाराने नेहमी त्याची देय रक्कम आणि कर्जाचा EMI देय तारखेला भरला पाहिजे. त्याचा थेट फायदा क्रेडिट स्कोअरवर होतो आणि भविष्यात कर्ज सहज उपलब्ध होते.

परंतु जेव्हा कर्जदार त्याची थकबाकी आणि कर्जाचा EMI वेळेवर भरत नाही, तेव्हा क्रेडिट स्कोअरवर याचा परिणाम होतो. त्यामुळे बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देणे टाळतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत, तुमचा क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा हे जाणून घ्या….

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

– जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करता तेव्हा त्याची थकबाकी वेळेवर भरा. यासोबतच इतर कर्जही वेळेवर भरावे. जर तुम्ही याआधी थकबाकी वेळेवर भरू शकत नसाल, तर देय रक्कम त्वरित भरणे चांगले.

– अनेकवेळा असे दिसून आले आहे की लोकं क्रेडिट कार्डने अनावश्यक खरेदी करतात. त्यामुळेच त्या वस्तूंची खरेदी क्रेडिट कार्डनेच करावी, ज्यांची तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच तुमच्या मिळकतीनुसार तुम्ही क्रेडिट कार्डने केलेली मासिक खरेदीही ठरवावी.

– कर्ज घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, एका बँकेकडून कर्जाचा अर्ज फेटाळला गेला, तर लगेच दुसऱ्या बँकेत अर्ज करू नये. कारण मागील बँकेत कर्जाचा अर्ज रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्जाचा अर्ज रद्द झाल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा अर्ज करावा.