आचार्य चाणक्य यांनी आदर्श पत्नी आणि पती याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचा जोडीदार आपलं जीवन सुखी बनवतो, कोणते गुण असतात ज्यामुळे लोक इतरांपेक्षा वेगळे आणि अधिक यशस्वी होतात, याबद्दल मार्गदर्शन केलंय. नीतिशास्त्रात प्रेमासाठी जोडीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे.

चाणक्य नीतिशास्त्रात असं सांगितलं आहे की, एखाद्या व्यक्तीने त्याच्या बरोबरीच्या व्यक्तीशी प्रेम संबंध ठेवले पाहिजे, कारण जेव्हा असमानता असते तेव्हा प्रेमाच्या नात्यात नेहमीच फूट पडत असते. ज्या नात्यात समानता नसते, अशी नाती अनेकदा तुटतात.

कुवतीची काळजी घ्या
प्रेम करा पण स्टेटस पण सांभाळा. आपल्यापेक्षा वरच्या दर्जाच्या व्यक्तीशी बनलेल्या प्रेमसंबंधांमध्ये अनेकदा दुरावा निर्माण होतो, तर खालच्या दर्जाच्या व्यक्तींसोबतही हाच त्रास पुढच्या काही काळात पाहायला मिळतो. उच्च दर्जाची व्यक्ती काही काळानंतर तुमचा स्वाभिमान दुखावू शकते, मग तीच खालची स्थिती निराशेत जगून नाते तोडण्याच्या मार्गावर आणते. यासाठी प्रेम करताना समोरच्या व्यक्तीची कुवत लक्षात ठेवा.

आणखी वाचा : Chanakya Niti: चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी पाळा, पत्नीसोबत कधीच भांडण होणार नाही

किती सहनशील आहे?
आचार्य चाणक्य म्हणतात की जो धीर धरतो, तो प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास सक्षम असतो. हे गुण स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय नेहमीच अडचणीत येतात. त्यामुळे प्रेमसंबंध बनवताना किंवा हे नाते पुढे नेताना एकदा जोडीदाराच्या संयमाची परीक्षा घ्या. संयम नेहमी तुमच्या सोबत असतो. धीर धरणारी स्त्री कधीच तुमचा साथ सोडणार नाही.

रागावर नियंत्रण
आचार्य चाणक्य स्पष्ट करतात की रागवलेली व्यक्ती आपल्या सभोवतालचे आनंददायी वातावरण खराब करते आणि नकारात्मकता पसरवते. अशा व्यक्तीसह आनंदी जीवनाचे स्वप्न पाहणे निरर्थक आहे. असे लोक तुम्हाला कधीही सोडून जाऊ शकतात किंवा तुमचे नुकसान करू शकतात, या लोकांपासून दूर राहा.