Grah Gochar In September 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची निश्चित वेळ असते आणि त्याचा प्रभाव सर्व राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. वाणी आणि व्यापार देणारा बुध आणि भाग्याचा अधिपती गुरु ग्रह सप्टेंबरमध्ये एका दिवशी भ्रमण करत आहेत. कुंडलीत बुधाची स्थिती बलवान असेल तर व्यक्तीच्या जीवनात लाक्षदायी ठरते, असे म्हटले जाते. त्याचबरोबर गुरूच्या बळामुळे ज्ञानात वाढ होते.

बुध आणि गुरु ग्रह बदलणार चाल

प्रत्येक कामात भाग्यवान व्यक्तीची साथ असते आणि जीवनात संकटात सापडलेली व्यक्ती जाणते. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रह २२ सप्टेंबरला आपली चाल बदलणार आहे. रविवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी बुध देव कन्या राशीमध्ये गोचर करतील आणि संध्याकाळी ०७ वाजून १४ मिनिटांनी गुरु मृगशिरा नक्षत्रात गोचर होत आहेत. याकाळात कोणत्या ३ राशींना विशेष लाभ मिळणार आहे हे जाणून घ्या…

सप्टेंबर बुध आणि गुरुच्या गोचरमुळे या ३ राशींचा होईल भाग्योदय

मेष

ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि गुरूचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना या दिवसात विशेष लाभ मिळतील. नोकरदारांची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. धार्मिक कार्याशी संबंधित असलेल्यांना सन्मान मिळेल. त्याचबरोबर तरुणांची धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल. या राशीच्या लोकांना मनःशांती मिळू शकते.

हेही वाचा – १२ महिन्यांनंतर सूर्य ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश, ‘या’ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, चांगले दिवस येणार

कन्या

या राशीच्या अविवाहित लोकांना यावेळी मित्रांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.बेरोजगारांना २२ सप्टेंबरपूर्वी नोकऱ्या मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. त्याबरोबर भविष्यात चांगले आर्थिक लाभही मिळू शकतील. या राशीचे विवाहित लोक आणि नातेसंबंधातील लोक त्यांच्या जोडीदारांबरोबरचे नाते मजबूत करतील.

हेही वाचा – देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा; एक वर्षानंतर शुक्र करणार स्वराशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर

ज्योतिष शास्त्रानुसार व्यवसायिकांचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल. जर युवा वर्गाच्या एखाद्या रोगापासून पीड़ित असेल तर 22 सप्टेंबरपर्यंत आजारातून सुटका मिळू शकते. नोकरीदार लोकांना अकस्मात धन लाभ होईल आणि मन प्रसन्न राहील. तसेच या राशीच्या लोकांच्या कुटुंबात कोणाचे तरी लग्न ठरू शकते.