Shani-Shukra Ardha kendra Yog 2025 : कर्मफळदाता शनी एका विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतो, ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर बराच काळ राहतो. शनी हा सर्वांत संथ गतीने फिरणारा ग्रह मानला जातो, जो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. त्यामुळे एका राशीत परत येण्यासाठी त्याला ३० वर्षे लागतात. शनी सध्या मीन राशीत स्थित आहे, तिथे तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करत असतो. त्यात आता शनी शुक्राशी युती करून अर्धकेंद्र राजयोग निर्माण करीत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी शुक्र-शनी एकमेकांपासून ४५ अंशावर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. या योगामुळे काही राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आणि धनलाभही होऊ शकतो. पण नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…
मेष
अर्धकेंद्र राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील अनेक आव्हानात्मक संकटे आता संपू शकतील. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकता, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. नवीन प्रभावशाली लोकांशी संपर्कात येऊ शकाल, ज्यामुळे तुमचा मान वाढेल. प्रवासाची संधी मिळेल, ज्यातून तुम्हाला बरेच फायदेही मिळू शकतात. तुमचा स्वतःचा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्य चांगले राहणार आहे. जीवनात सुरू असलेला ताण थोडा कमी होऊ शकतो. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही कामाचे प्रमुख क्षेत्र शोधू शकता आणि तुमच्या कंपनी किंवा व्यवसायासाठी ठरवलेले ध्येय साध्य करू शकता.
वृषभ
शनी-शुक्राचा अर्धकेंद्र योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि त्यांनाि पदोन्नती मिळू शकते. आयुष्यात सुरू असलेल्या अनेक समस्या संपू शकतात. शिक्षण क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात. मुलांमुळे सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. आता पैशांची चिंता करण्याची गरज भासणार नाही. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.
मकर
शनी-शुक्र अर्ध-केंद्र योग मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुरू असलेला कलह संपुष्टात येऊ शकतो. त्यांचे वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या कठोर मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमचे काम आवडू शकते. पदोन्नतीची शक्यता आहे आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.