वैद्यनाथ, संत एकनाथ हे कारखाने बंद राहणार

मराठवाडय़ात या वर्षी चांगला पाऊस झाला तरी या हंगामात तातडीने ऊस गाळपासाठी येण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, काही साखर कारखान्यांनी गाळपाचे परवानेच मागितलेले नाही. यात बीडचा वैद्यनाथ, पैठणचा संत एकनाथ, समृद्धी या कारखान्यांचा समावेश आहे. पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्यामध्ये उसाच्या अभावाचे कारण दिले जात असले तरी या कारखान्यात राजकारण घुसल्याने या वर्षी हे कारखाने सुरू होणार नाहीत. औरंगाबाद विभागातील १३ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केला आहे.

satej patil kolhapur lok sabha marathi news
“…तर रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार”, सतेज पाटील यांचा इशारा
Ranajagjitsinha Patil - Om Rajenimbalkar
“…तर राजकारण सोडून देईन”, ओमराजेंनी तेरणा महाविद्यालयावरून केलेल्या आरोपांवर राणा पाटलाचं उत्तर
raju shetti marathi news, raju shetti kolhapur lok sabha marathi news
“खलनायक नव्हे नायक!”, इचलकरंजीच्या पाणी योजनेवर राजू शेट्टी यांची मार्मिक टिप्पणी
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट

औरंगाबाद जिल्हय़ातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच छत्रपती संभाजीराजे, बारामती अ‍ॅग्रो, मुक्तेश्वर या खासगी कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली आहे. मराठवाडय़ात या हंगामात ३९ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. बहुतांश ऊस बेण्यासाठी वापरला जात असल्याने दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ कारखाने चालणार नाहीत, असे सांगितले जाते. औरंगाबाद विभागात गेल्या वर्षी ५६ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. या वर्षी ते अजून घटेल, अशीच आकडेवारी आहे. पाऊस चांगला झाल्याने पुढील वर्षी गाळपासाठी अधिक ऊस उपलब्ध होईल, असे सहकारी विभागातील अधिकारी सांगतात. बीड जिल्हय़ात ऊस उपलब्ध नसल्याने वैद्यनाथ साखर कारखाना सुरू होणार नाही. तसेच समृद्धी आणि जळगाव जिल्हय़ातील चोपडा हे कारखाने सुरू होणार नाहीत.