औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीतील एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांच्या घराजवळच राहणाऱ्या संशयिताने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या हत्याकांडामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हा विक्षिप्त असल्याचे समजते.

दिनकर भिकाजी बोराडे (वय ५५),  कमलबाई दिनकर बोराडे (५०) मुलगा भागीनाथ बोराडे ( २५ )  अशी मृतांची नावे आहेत. तर अमोल बोर्डे, असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच सिडको एमआयडीसीचे पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. पुढील तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णाल्यात हलवण्यात आले आहेत