डॉ. शुभांगी पारकर
सामूहिक आत्महत्या का घडत असतील, या प्रश्नामागे अनेकदा खूप मोठं आर्थिक नुकसान, दारुण अपमान ही कारणं असू शकतात, पण त्याहीपेक्षा मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही, कोणीच आपल्याला यातून सोडवू शकणार नाही, ही नैराश्याची भावना हे कारण मुख्य असतं. अर्थात याला गाजलेलं बुराडी प्रकरण अपवाद. एखादा म्हणतो आणि घरातले सगळे सदस्य मृत्यूला मिठी मारायला कसे तयार होतात हा गूढ प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. काय असू शकेल सामूहिक आत्महत्येमागची मानसिकता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे आत्महत्या करण्यासाठी गंभीर पाऊल उचलण्यास सहमती देतं तेव्हा कौटुंबिक आत्महत्या होते. गेल्या २-३ वर्षांत कौटुंबिक आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडे महाराष्ट्राला अस्वस्थ करणारी, हृदय पिळवटून टाकणारी एक घटना आपण बातम्यांत वाचली, ती म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या वनमोरे कुटुंबातल्या नऊ जणांनी सामूहिकपणे विषप्राशन करून केलेली आत्महत्या. १ कोटी रुपयांचं सावकारी कर्ज घेऊन ते फेडता न आल्याचं आणि त्यांचा कर्जदारांनी अतोनात मानसिक छळ केल्याचं चिठ्ठय़ांमध्ये लिहून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी जाहीर झालं होतं, परंतु पोलिसांच्या तपासानुसार या आत्महत्या नसून हत्या आहेत आणि त्या प्रकरणी त्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे, मात्र त्यानिमित्तानं आठवल्या त्या गेल्या काही वर्षांतल्या सामूहिक आत्महत्या.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insult the mindset of mass suicide mindset amy
First published on: 02-07-2022 at 01:34 IST