सुशांत सिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकार आमने सामने आलं होतं. सुशांत प्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास करण्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं सांगितलं. तसंत सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत सिंह प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“….रिया चक्रवर्तीची लायकी नाही,” बिहारचे पोलीस महासंचालक मीडियासमोरच संतापले

“रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली असून यामुळे सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे,” असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचं सिद्ध झालं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करा,” नारायण राणेंचा ठाकरे सरकारला सल्ला

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास सांगितलं. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी म्हटलं.