इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेल्या #10YearChallenge ने सध्या धुमाकूळ घातला आहे. जुने फोटो, मिम्स, टोमणे, सामाजिक संदेश असं बरचं काही या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले जात आहे. यामध्ये अगदी सेलिब्रिटी, ब्रॅण्ड्सबरोबरच आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. विरोधीपक्षांवर शेरेबाजी करण्यासाठी, टिका करण्यासाठी अनेक नेत्यांनी हा हॅशटॅग वापरून फोटो पोस्ट केले आहेत. मात्र आता थेट भाजपाने या व्हायरल ट्रेण्डचा आधार घेत लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पाच वर्षात काय केले हे #5YearChallenge या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून अनेक फोटो शेअर करण्यात आले असून यामध्ये सन २०१३ साल आणि २०१९ सालाची तुलना करण्यात आली आहे. अगदी कुंभ मेळ्यापासून ते स्वच्छ भारत योजनेतेपर्यंत आणि बांधकाम क्षेत्रापासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात कशाप्रकारे भाजपाच्या कार्यकाळात देशाने प्रगती केली आहे यासंदर्भातील फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. चला तर पाहुयात काय काय पोस्ट केले आहे भाजपाने आपल्या या #5YearChallenge मोहिमेमध्ये. कुंभ मेळ्यासाठी २०१३ साली देण्यात आलेली रक्कम १ हजार ३०० कोटी. भाजपाच्या कार्यकाळात २०१९ साली कुंभ मेळ्यासाठी देण्यात आलेली रक्कम ४ हजार २०० कोटी Here is our #5YearChallenge. In 2013, only Rs. 1,300 crore were allocated for Kumbh. In 2019, Rs. 4,200 crore budget provided for Kumbh 2019. pic.twitter.com/5m0dVQTJu0 — BJP (@BJP4India) January 18, 2019 हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून जाणारा इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे नियोजित वेळेआधी पूर्ण केला पाच वर्षात Here is our #5YearChallenge. Western Peripheral Expressway, providing world-class infrastructure, became operational in a time-bound deadline. pic.twitter.com/P4O1e3nLG3 — BJP (@BJP4India) January 18, 2019 बोगीबील पूल २०१३ साली आणि आत्ता २०१९ साली Here is our #5YearChallenge. Bogibeel Bridge, which was pending for decades, eventually saw the light of day under Modi government. pic.twitter.com/V4DD0hz1Z0 — BJP (@BJP4India) January 18, 2019 खरीप पिकांचे तेव्हाचे आणि आत्ताचे किमान समर्थन मूल्य (MSP) खरीफ फसलों का न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) में वृद्धि। #5YearChallenge pic.twitter.com/o2NHnedlTP — BJP (@BJP4India) January 18, 2019 कोल्लाम बायपास हा ४३ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मोदी सरकारने २०१५ साली हाती घेतला आणि तो पाच वर्षांच्या आता बांधून पूर्ण केला. Here is our #5YearChallenge. The 13 km Kollam bypass project was delayed for 43 years. In 2015, Modi government took note of this project and completed it in 4 years. pic.twitter.com/rKPpZyVxNg — BJP (@BJP4India) January 18, 2019 रब्बी पिकांचे तेव्हाचे आणि आत्ताचे किमान समर्थन मूल्य (MSP) रबी फसलों का न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) में वृद्धि। #5YearChallenge pic.twitter.com/MdqwyqNPC8 — BJP (@BJP4India) January 18, 2019 २०१३ साली देशातील ५० टक्के घरांमधील व्यक्तींकडे बँक खाते होते आज देशातील जवळजवळ सर्वच घरांमधील व्यक्तींचे बँक खाते असल्याचे भाजपाने म्हटले आहे. 2014 तक भारत के सिर्फ 50% घरों के पास बैंक खाता था। 2018 तक लगभग हर घर को बैंक खातों से जोड़ा दिया गया है। #5YearChallenge pic.twitter.com/1ij8RXVLnd — BJP (@BJP4India) January 18, 2019 देशात २०१३ साली ८४ हजार सामान्य सेवा केंद्रे होती हीच संख्या २०१९ रोजी वाढून ३ लाखहून अधिक झाली आहे असं भाजपाचं म्हणणं आहे. 2014 तक 84 हजार कॉमन सर्विस सेंटर थे । 2018 में बढ़कर 3 लाख से ज्यादा हुए। #5YearChallenge pic.twitter.com/EyPqxzZbIq — BJP (@BJP4India) January 18, 2019 ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण २०१४ मधील ३८ टक्क्यांवरून २०१९ मध्ये ९५ टक्क्यांपर्यंत पोहचल्याचा भाजापाने दावा केला आहे. ग्रामीण स्वच्छता कवरेज: 2014 तक भारत में केवल 38% लोगों तक शौचालयों की पहुंच थी, जो 2018 में 95% तक पहुंची। #5YearChallenge pic.twitter.com/f9CTc3kISK — BJP (@BJP4India) January 18, 2019 पाच वर्षापूर्वी ५५ टक्के घरांमध्ये गॅस कनेक्शन होते आज हा आकडा ९० टक्क्यांवर पोहचल्याचा भाजपाचा दावा ग्रामीण स्वच्छता कवरेज: 2014 तक भारत में केवल 38% लोगों तक शौचालयों की पहुंच थी, जो 2018 में 95% तक पहुंची। #5YearChallenge pic.twitter.com/f9CTc3kISK — BJP (@BJP4India) January 18, 2019 ग्रामीण भागातील घरांमध्ये वीज पोहचवण्याचे प्रमाण पाच वर्षात २५ टक्क्यांनी वाढले 2014 तक ग्रामीण घरों में बिजली कवरेज 70% थी जो 2018 में 95% तक पहुंची है । #5YearChallenge pic.twitter.com/2ROa7APHyo — BJP (@BJP4India) January 18, 2019 उद्योगानुकूलतेबाबत देशाच्या मानांकनात वेगाने वाढ २०१४ साली १४२ व्या क्रमांकावर असणारा भारत २०१८ साली या यादीमध्ये ७७ व्या स्थानी Here is our #5YearChallenge. India’s ranking in World Bank's Ease of Doing Business has risen to 77 in 2018 from 142 in 2014. pic.twitter.com/T9tWPc0B37 — BJP (@BJP4India) January 18, 2019 परदेशी गुंतवणूकदारांमध्ये वाढ Here is our #5YearChallenge. FDI inflows hit to USD 60.97 billion in 2017-18, leading to more investment, more jobs & more development. pic.twitter.com/9TpjEOJ3JL — BJP (@BJP4India) January 18, 2019 गावागावांमध्ये रस्ते पोहचले Here is our #5YearChallenge. Rural road connectivity has risen to 91% in 2018 from 55% in 2014. pic.twitter.com/iDorvPs7BE — BJP (@BJP4India) January 18, 2019 शेती संबंधीत स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली Here is our #5YearChallenge. Massive increase in the investments for Agri-food startups, up from $8.9 crore in 2013 to $34.2 crore in 2017. pic.twitter.com/CIbd9xm0Pl — BJP (@BJP4India) January 18, 2019 अशाप्रकारे भाजपाच्या आयटी सेलने #10YearChallenge चा व्हायरल ट्रेण्ड इनकॅश करुन #5YearChallenge च्या माध्यमातून भाजपा सरकारच्या कार्यकाळातील कामांचा आढावा नेटकऱ्यांसमोर मांडला आहे.