आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जहालमतवाद्यांना प्रोत्साहन देत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.  राहुल गांधी यांचा इशारा खलिस्तानवाद्यांकडे होता. अरविंद केजरीवाल हे या शक्तींना मदत करत आहेत असे राहुल यांनी पंजाबमधील प्रचारसभेत म्हटले.

या शक्तींना उभे राहण्यास अरविंद केजरीवाल मदत करत आहेत असे राहुल यांनी म्हटले.  काँग्रेस उमेदवार हरमिंदर सिंग जस्सी यांच्या भटिंडा येथील प्रचारसभेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये सहा लोकांचे प्राण गेले. हा स्फोट खलिस्तानवाद्यांनी केला आणि अरविंद केजरीवाल हे अशा लोकांना प्रोत्साहन देत आहेत असे राहुल म्हणाले.

राहुल यांनी शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षावरही टीका केली. जेव्हा पंजाबी लोक गरिबीमध्ये राहत आहेत त्याच वेळी बादल परिवार मात्र ऐशोआरामात जीवन जगत आहे असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि एसएडीच्या काळात पंजाबने ड्रग्जविरुद्धचा लढा पूर्णतः हरला आहे असे ते म्हणाले. जर पंजाबमध्ये सत्ता आली तर आम्ही ड्रग्जचा प्रश्न पूर्णपणे सोडवू असे ते म्हणाले.  गुरू नानक यांचा संदर्भ देऊन त्यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला. गुरू नानकची हे तेरा तेरा असं म्हणत असत परंतु आप सरकार मात्र केवळ मेरा मेरा असं म्हणते.