पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्र (आरएसके)चे उद्घाटन केले. महात्मा गांधी यांना समर्पित राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची सर्वात पहिली घोषणा पंतप्रधान मोदी यांनी १० एप्रिल २०१७ रोजी गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केली होती. आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनाची आठवण करून दिली. "भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत. याच अनुशगांने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात." असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी 'भारत छोडो'चा यावेळी नारा दिला. भारत छोड़ो के ये सभी संकल्प स्वराज से सुराज की भावना के अनुरूप ही हैं। इसी कड़ी में आज हम सभी को ‘गंदगी भारत छोड़ो’ का भी संकल्प दोहराना है। आइए, आज से 15 अगस्त तक यानि स्वतन्त्रता दिवस तक देश में एक सप्ताह लंबा अभियान चलाएं: PM @narendramodi — PMO India (@PMOIndia) August 8, 2020 राष्ट्रीय स्वच्छता केंद्रात पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा दिवस मोठा ऐतिहासिक दिवस आहे. देशाच्या स्वतंत्रता संग्रमात ८ ऑगस्टचे फार मोठे योगदान आहे. आजच्याच दिवशी १९४२ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यासाठी एक विराट जनआंदोलन सुरू झाले होते. इंग्रजांना उद्देशून ''भारत छोडो'' चा नारा लगावण्यात आला होता. अशा ऐतिहासिक दिवशी राजघाटाजवळ राष्ट्रयी स्वच्छता केंद्राचे लोकर्पण हे खरचं फार प्रासंगिक आहे. हे केंद्र म्हणजे बापूंनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाप्रति १३० कोटी भारतीयांची एकप्रकरे श्रद्धांजली आहे, कार्यांजली आहे. ऐसे ऐतिहासिक दिवस पर, राजघाट के समीप, राष्ट्रीय स्वच्छता केंद्र का लोकार्पण अपने आप में बहुत प्रासंगिक है। ये केंद्र, बापू के स्वच्छाग्रह के प्रति 130 करोड़ भारतीयों की श्रद्धांजलि है, कार्यांजलि है: PM @narendramodi — PMO India (@PMOIndia) August 8, 2020 बापू, स्वच्छतेमध्ये स्वराज्याचे प्रतिबिंब पाहत होते. ते स्वच्छतेला स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा एक मार्ग देखील मानत होते. राष्ट्रीय स्वच्छात केंद्र म्हणजे, गांधीजींचा स्वच्छतेचा आग्रह व त्यासाठी समर्पित कोटी-कोटी भारतीयांच्या विराट संकल्प यांची एका ठिकाणी घातली गेलेली सांगड आहे. थोड्यावेळापूर्वीच या केंद्रात कोट्यावधी भारतीयांच्या प्रयत्नांचे केलेले संकलन पाहून मी त्यांना मनोमन नमन केले. गांधीजी म्हणत होते की, स्वराज्य केवळ साहसी आणि स्वच्छ जनच आणू शकता. स्वच्छता आणि स्वराज्य यांच्यातील नात्याबद्दल गांधीजी यासाठी आश्वस्त होते कारण, त्यांना विश्वास होता की अस्वच्छता जर सर्वाधिक नुकसान कुणाचं करत असले तर ते म्हणजे गरीबाचं. असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणले.