सोशल मीडियाच्या संदर्भात भारत सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. ज्या सोशल मीडिया अकाऊंटला प्रसिद्ध व्यक्तींचे किंवा स्वतःव्यतिरिक्त इतरांचे फोटो आहेत, असे अकाऊंट्स २४ तासात डिलीट करण्यात येणार आहे. या व्यक्तींनी खुद्द तक्रार केली किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये ही कारवाई होणार आहे.

सरकारने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब अशा सर्व सोशल मीडिया कंपन्यांना हा नियम सक्तीचा केला आहे. सरकारकडून सांगण्यात आलं की हा नियम माहिती तंत्रज्ञान कायद्याचाच भाग असेल. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार आल्यानंतर त्वरीत कारवाई करावी लागेल.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा- ट्विटर युजर्ससाठी आले नवे फिचर; आता इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये ट्विट करता येणार शेअर

म्हणजे जर एखादा अभिनेता, क्रिकेटर, राजकीय नेते किंवा कोणतीही व्यक्ती यांचा फोटो प्रोफाईलला वापरला असेल आणि या व्यक्तींनी किंवा त्यांच्या संबंधितांनी या फोटोवर आक्षेप घेत सोशल मीडिया कंपनीकडे तक्रार केली, तर कंपनीला २४ तासात ते प्रोफाईल बंद करणं बंधनकारक असेल. मग हा फोटो लाईक्स मिळवण्याच्या हेतूने वापरलेला असो अथवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी वापरला असो, तक्रार आल्यानंतर हे प्रोफाईल बंद करावंच लागेल.

अनेक कारणांसाठी अशी फेक अकाऊंट तयार करण्यात येतात. या अकाऊंटला प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो लावले जातात. खोडी काढण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठीही ही अकाऊंट तयार केली जातात. अशा अकाऊंटच्या माध्यमातून अनेकदा आर्थिक फसवणूकही केली जाते. प्रसिद्ध व्यक्तींचे चाहते बऱ्याचदा असे प्रोफाईल्स तयार करतात.