लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या नागरिकांसाठी एअर इंडिया १९ मे ते दोन जून दरम्यान देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान ही विशेष विमाने उड्डाण करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल. चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम पूर्णपणे नवीन असतील असे मोदींनी काल जाहीर केले. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून अजून बुकिंग सुरु झालेली नाही.
दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या चार प्रमुख महानगरांदरम्यान सर्वाधिक विमाने सोडण्यात येतील.

दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमाने उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमाने सोडण्यात येतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india to operate special domestic flights to several indian cities dmp
First published on: 13-05-2020 at 12:55 IST