सध्या विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बराच गाजतोय. केवळ बॉलिवूड कलाकार आणि काही राजकीय नेतेच नाही तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं असून चित्रपट पाहण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. दरम्यान, द कश्मीर फाईल्स चित्रपटावरून हैदराबादचे खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

The Kashmir Files आधी काश्मीरच्या परिस्थितीवर बनले होते ‘हे’ लोकप्रिय चित्रपट

एनडीटीव्हीशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडीओ बनवत आहेत. देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे? सोशल मीडियावर असे किती व्हिडीओ पडले आहेत, ज्यात लोक सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, असं का होतंय?,” असे प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत.

“काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून दाखवू नका”; बाळासाहेबांची आठवण करुन देत संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं

पुढे ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी पंडित मारले गेले. माझ्याकडे सगळ्यांची नावं आहेत, जी मी देऊ शकतो. पण जे १५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी पंडित नव्हते, जे डोग्रा भागातील होते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?, असा सवाल करत गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला.

“ब्राह्मणांसाठी जानवं आवश्यक, पण…;” हिजाब निकालावर संतापले असदुद्दीन ओवेसी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओवेसी म्हणाले की, “मी अनेकदा लोकसभेत म्हटलोय की, तुम्ही कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करा, सगळं समोर येईल की आतापर्यंत किती काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले आणि का?, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सात वर्षांच्या काळात तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये पाठवलं, हे देखील सांगा, फक्त द्वेष पसरवू नका,” असं म्हणत ओवेसींनी मोदी सरकारवर टीका केली.