scorecardresearch

Premium

“ब्रम्होस चीन सीमेवर नेलं नाही तर सुरक्षा कशी करणार?, रस्ते रुंद हवेत,” सुप्रीम कोर्टात मोदी सरकारची मागणी

भारत-चीन सीमेला लागून असलेल्या पर्वतीय प्रदेशात महत्त्वपूर्ण लष्करी उपकरणे पोहोचवण्यासाठी उत्तराखंडच्या चार धाम प्रदेशात रस्ते रुंद असणे आवश्यक आहेत, असे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

SC - bromhos
(संग्रहित छायाचित्र)

भारत-चीन सीमेला लागून असलेल्या पर्वतीय प्रदेशात महत्त्वपूर्ण लष्करी उपकरणे पोहोचवण्यासाठी उत्तराखंडच्या चार धाम प्रदेशात रस्ते रुंद असणे आवश्यक आहेत, असे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. “लष्कराला या प्रदेशात ब्रह्मोस न्यायचा आहे. त्यासाठी मोठी जागा लागेल. परिणामी भूस्खलन झाल्यास लष्कर त्याचा सामना करेल. जर रस्ते पुरेसे रुंद नसतील तर आम्ही कसे जाणार?” असा अटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केंद्रातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

चार धाम महामार्ग १० मीटरपर्यंत रुंद करण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात एका एनजीओ केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी झाडे तोडल्यास मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि इतर पर्यावरणीय आपत्तींमध्ये वाढ होऊ शकते, असं म्हणत ग्रीन दून या स्वयंसेवी संस्थेने महामार्गाच्या रुंदीकरणाला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

केंद्र सरकारने, पूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, १० मीटर रुंद कॅरेजवे असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी उच्चाधिकार समितीची शिफारस स्वीकारण्याची विनंती न्यायालयाला केली होती, असे पीटीआयने वृत्त दिले होते. “चीन सीमेच्या दुसऱ्या बाजूला हेलिपॅड आणि इमारती बांधत आहे. त्यामुळे तोफखाने, रॉकेट लाँचर्स आणि टँक घेऊन जाणाऱ्या ट्रकना या रस्त्यांवरून जावे लागेल,” वेणुगोपाल यांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले.

भूस्खलनाच्या जोखमीमुळे धोकादायक प्रदेशात रस्ते ५ मीटरपेक्षा जास्त रुंद असू शकत नाहीत, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने याआधी दिला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Char dham road brahmos needs to be taken to lac need wide roads says govt hrc

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×