मोबाईवरून पती-पत्नीत वाद झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. पण, उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईवरून पती-पत्नीत जोरदार भांडण झालं. यानंतर पत्नी रागाने आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली. याच कारणामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेशातील गुलहरिया गाजीपूर गावातील बोटनपुरवा परिसरात हनुमान कश्यप नावाचा व्यक्ती पत्नी आणि कुटुंबासह राहत होता. दोन दिवसांपूर्वी हनुमानचा फोन हरवला होता. शोध घेतल्यानंतर त्याने पत्नीला मोबाईबद्दल विचारलं. कारण, हनुमानला शंका होती की, पत्नीला मोबाईलबाबत माहिती आहे. पण, पत्नीने माहिती नसल्याचं सांगितलं. यातूनच दोघांत जोरदार खडाजंगी झाली. यानंतर पत्नी आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली.

हेही वाचा : दिल्लीत गँगवार! अंगणात बसलेल्या चौघांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या दोन्ही मुलांना…”

घरात एकट्या असलेल्या हुनमानने आपल्या शर्टाच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कुटुंबीयांना हनुमानचा मृतदेह छताला लटकताना दिसला, तेव्हा त्याचा भाऊ संतारामने याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी हनुमानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा : मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, मेहरबानला पोलिसांनी केली अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुजूरपुर ठाण्याचे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, “पत्नीबरोबर झालेल्या वादानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.” ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.