लिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. या सुटकेनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिक्रिया देताना, चौघाजणांपैकी लक्ष्मीकांत आणि विजय कुमार यांना सोडविण्यात यश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरम्यान, इतर दोघांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. लिबियातील सर्टे या शहरात इसिसचा मोठा प्रभाव असून गुरूवारी संध्याकाळी येथून चार भारतीय प्राध्यापकांचे अपहरण करण्यात आले होते. यापैकी दोघेजण हैदराबाद, एकजण रायचूर आणि एक प्राध्यापक बेंगुळरूमधील आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांच्याकडून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली होती. हे सर्व जण गुरूवारी त्रिपोली आणि ट्युनिसमार्गे भारताकडे येण्यास निघाले होते. त्यावेळी सर्टे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकनाक्यावरून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. अपहरण करण्यात आलेले चारही प्राध्यापक गेल्या एक वर्षापासून लिबियातील विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. इसिसच्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून भारतीय नागरिकांना लिबिया सोडण्याची सूचना केली होती. याच दहशतवादी संघटनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागातून हे अपहरण झाले आहे.

Achinthya Sivalingam
भारतीय विद्यार्थिनीला अमेरिकेत अटक, पॅलेस्टाईन समर्थनार्थ विद्यापिठात निदर्शने केल्याने कारवाई!
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…