आंध्र प्रदेशात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सलग पाच दिवस पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. आंध्र प्रदेशातील ओंगोले शहरात ही घटना घडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृहमंत्री एस सुचरिता यांनी याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. प्रकाशम जिल्ह्याचे पोलीस अधिधक्ष सिद्धार्थ कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१७ जून रोजी पीडित तरुणी ओंगोले येथे आरटीसी बस स्थानकावर उभी असता आरोपींपैकी एका तरुणाने मुलीशी मैत्री केली. यानंतर तो तिला आपल्यासोबत रुमवर घेऊन गेला जिथे त्याने आणि त्याच्या पाच मित्रांनी सलग पाच दिवस तरुणीवर बलात्कार केला’.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त

यानंतर पीडित तरुणीने आपली सुटका करुन घेतली आणि शनिवारी रात्री बस स्थानक गाठलं. तिथे कर्तव्यावर असणारे होमगार्ड वेंकेटेश्वरलू आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू राव यांनी तिला पाहिलं आणि सुटका केली असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. यानंतर तरुणीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतलं आहे. आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक गौतम सावंग यांनी घटनेचा निषेध केला असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. ‘ही अत्यंत क्रूर गुन्हा असून अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करु’, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.