नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला ६३१ भारतीय मच्छीमार व अन्य दोन नागरिकांची कैदेतून मुक्तता करून त्यांना भारतात परत पाठवण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी त्यांची कारावासाच्या शिक्षेची मुदत पूर्ण केली आहे व ज्यांच्या भारतीय राष्ट्रीयत्वाची खात्री झाली आहे अशा सर्वाना मुक्त करण्याचे आवाहन भारताने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय नागरिक असण्याची शक्यता असलेले ३० मच्छीमार व २२ नागरिकांना तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्काची सुविधा प्रदान करण्याचेही आवाहन भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India appeals to release 633 indian prisoners in pakistan zws
First published on: 02-01-2023 at 01:59 IST