मुंबईत दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या लष्कर ए तैयबावर इस्रायलने बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेला घातक म्हणत त्यांनी दहशतवादी संघटनाच्या इस्रायली यादीत समावेश केला आहे. भारतातील इस्रायल दूतावासाने याबाबतची माहिती दिली.

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईच्या ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेने हल्ले चढवले होते. यामध्ये शेकडो नागरिकांचे प्राण गेले, तर कोट्यवधींची वित्तहानी झाली होती. या घटनेचे पडसाद जगभरातून उमटले होते. या हल्ल्याच्या जखमा मुंबईकरांच्या काळजातून अद्यापही सुकलेल्या नाहीत. यंदा या घटनेला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने इस्रायलने त्यांच्या देशाने तयार केलेल्या दहशतवादी संघटनेच्या यादी टाकलं आहे. याबाबतची माहिती भारतातील इस्रायल दूतावासाने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

भारताप्रमाणेच इस्रायलही त्यांच्या सीमेच्या आत आणि आसपासच्या भागात सक्रियपणे कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांची यादी तयार करतो. या यादीला यूएस स्टेट डिपार्टमेंटने जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लष्कर ए तैयबा ही एक प्राणघातक आणि निंदनीय दहशतवादी संघटना आहे. या संघटनेने शेकडो भारतीय नागरिकांचे प्राण घेतले आहेत. शेकडो भारतीयांच्या हत्येसाठी ही संघटना जबाबदार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी या संघटनेने केली घृणास्पद कृत्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.