Katra-Srinagar Vande Bharat पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर ते कटरा या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. श्रीनगर ते कटरा या ठिकाणांसाठी दोन स्पेशल वंदे भारत तयार करण्यात आल्या आहेत. या दोन ट्रेन्ससह इतर ठिकाणच्या वंदे भारत ट्रेन्सना व्हर्चुअली हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. काश्मीर खोरं रेल्वे मार्गाने जोडण्याचा हा प्रकल्प ऐतिहासिक ठरला आहे कारण हा प्रकल्प चार दशकांपूर्वी सुरु झाला होता. ६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वैष्णो देवी ते काश्मीरपर्यंत आता वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या दरम्यान १११ किमीचा रेल्वे मार्ग अखेर सुरु होणार आहे. कटरा-बनिहाल सेक्शनसह हा मार्ग पूर्णपणे सुरु होईल. जानेवारी २०२५ मध्ये हा मार्ग पूर्ण होणार होतो. त्यानंतर १९ एप्रिल रोजी या मार्गाचं उद्घाटन होणार होतं. मात्र वातावरणातील विविध बदलांमध्ये काही काळ काम थांबवण्यात आलं होतं. आता ६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवतील. तसंच १९ एप्रिलनंतर पहलगामचा दहशतवादी हल्लाही झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावही वाढला होता आणि युद्धसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली होती.
४३ हजार कोटींची गुंतवणूक
कटरा ते श्रीनगर आणि श्रीनगर ते कटरा अशा दोन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. या दोन शहरांच्या दरम्यान या दोन वंदे भारत हाय स्पीड ट्रेन धावतील. जम्मू आणि श्रीनगर या दोन ठिकाणांच्या दरम्यान रेल्वे मार्गाचं काम सुरु आहे. त्यामुळे कटरा येथे येऊन प्रवाशांना पुढील प्रवास करावा लागणार आहे. USBRL प्रकल्पासाठी ४३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. कटरा बनिहाल सेक्शनमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.