आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी. चौकोनी आणि सुखी कुटुंब. पण कुटुंबप्रमुखाची एक चूक झाली आणि हे सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. कारण या सगळ्यांनी आत्महत्या केली. ही घटना घडली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. App लोनच्या विळख्यात अडकल्यामुळे या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करुन आयुष्य संपवलं आहे. ही घटना भोपाळच्या रातीबड पोलीस ठाणे परिसरातील आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एक पत्र या कुटुंबाच्या घरात मिळालं आहे. त्यानुसार एप्रिल २०२३ ला या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या मोबाइलवर What’s App वर एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये कोलंबिया बेस्ड एका कंपनीमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. हा मेसेज पुन्हा टेलिग्राम या अॅपवरही आला. थोडे पैसे देऊन ही नोकरी मिळणार होती त्यामुळे या कुटुंबाचा प्रमुख नोकरी करायला तयार झाला. त्याने या कंपनीसाठी काम करण्यासही सुरुवात केली.
हे पण वाचा- VIDEO: सावधान! फ्री फायर गेमचं व्यसन; मुलाने गमावलं मानसिक संतुलन; पहा काय झालीय अवस्था
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला या कुटुंबाला थोडा फायदा झाला. मात्र हळूहळू हा माणूस या कंपनीच्या जाळ्यात ओढला गेला. पैसे संपले तेव्हा कंपनीनेच त्यांना कर्ज ऑफर केलं. एकदा नाही त्यापेक्षा जास्त वेळा कर्ज देण्यात आलं. हळूहळू या कुटुंबाचा प्रमुख कोलंबियाच्या कंपनीच्या कर्जाच्या जाळ्यात ओढला गेला. पैसे दिले नाहीत तेव्हा कंपनीकडून धमक्या आल्या. कुटुंबाच्या फोटोचा वापर करुन ते फोटो व्हायरल करु अशाही धमक्या येऊ लागल्या. या धमक्या येऊ लागल्याने आणि प्रचंड मानसिक त्रास होऊ लागल्याने या कुटुंबप्रमुखाने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- “तो न्याय मागायला आलाय”, शरीरात सुशांत सिंह राजपूतचा आत्मा शिरल्याचा महिलेचा दावा; म्हणाली, “माझा पुर्नजन्म…”, पाहा Viral Video
डिजिटल लोन विषयी RBI ने काय म्हटलं आहे?
आपल्या देशात डिजिटल लेंडिंगशी संबंधित फ्रॉड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यानंतर RBI ने कठोर गाईडलाईन्स आखल्या आहेत. झटपट लोन अप्रुव्ह करणाऱ्या अनेक ऑफर्स स्मार्ट फोनवर येत असतात. मात्र या जाळ्यापासून लांब कसं रहायचं याविषयच्या गाईडलाईन्स आरबीआयने दिल्या आहेत. कारण अशा प्रकारे कर्जात बुडून फक्त एक माणूस नाही तर त्याचं कुटुंबही उद्ध्वस्त होतं. भोपाळच्या घटनेत नेमकं हेच पाहण्यास मिळालं आहे. ग्राहकांना प्रलोभन दिलं जातं आणि कर्जाच्या जाळ्यात ओढलं जातं त्यामुळे प्रचलित बँका सोडून इतर कुठल्याही अनोळखी संस्था किंवा कंपनीकडून कर्ज घेऊ नये असंही आरबीआयने म्हटलं आहे.