नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही. २०१९ प्रमाणे या वेळीही काँग्रेसने मोदींविरोधात लेखी तक्रार केल्यामुळे आयोगाला निर्णय घ्यावा लागणार असून दिरंगाई केल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. तसे झाल्यास पाच वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकेल.

राजस्थानमधील प्रचारसभेत मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा आधार घेत पक्षावर ‘संपत्तीच्या फेरवाटपा’चा आरोप केला होता. हिंदूंची संपत्ती, हिंदू महिलांचे मंगळसूत्रदेखील काँग्रेस हिसकावून घेईल आणि जास्त अपत्य जन्माला घालणाऱ्यांना, घुसखोरांना (मुस्लिमांना) देईल, असे विधान केले होते. लोकसभा निवडणुकीत धर्माच्या आधारावर हिंदू-मुस्लीम भेद निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

Congress president Mallikarjun Kharge criticizes central government regarding MNREGA scheme
मनरेगा हे मोदींच्या ग्रामीण भारताच्या विश्वासघाताचे ‘जिवंत स्मारक’; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Case against alleged RTI activist in ex corporator molestation case Pune news
माजी नगरसेविकेचा विनयभंग प्रकरणात कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा; विकास कामात अडथळा आणून जातीवाचक शिवीगाळ
mira Bhayandar , BJP, Narendra Mehta, assembly elections, Mira Road, internal disputes, Gita Jain, Ravi Vyas, election candidacy, former MLA, BJP workers, mira bhayandar news,
नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता
congress chief claim govt u turn on lateral entry
आमच्यामुळेच निर्णय रद्द!‘थेट भरती’वरून काँग्रेस अध्यक्षांचा दावा, ‘इंडिया’ नेत्यांची सरकारवर टीका
Delhi HC directs reconstitution of IOA ad-hoc panel for wrestling
भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती; बजरंग, विनेश, साक्षी, सत्यवर्तच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय
Who is Neelam Gorhe
Neelam Gorhe : विधान परिषदेच्या आमदार ते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या शिवसेनेच्या पहिल्या महिला नेत्या; राजकीय पार्श्वभूमी नसतानाही नीलम गोऱ्हेंनी कशी साधली किमया?
raosaheb danve Active in jalna
पराभवानंतर रावसाहेब दानवे पुन्हा जालन्यात बांधणीसाठी मैदानात

हेही वाचा >>>नेते गेले तरी कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच! ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत खरगे यांच्याकडून सत्ताबदलाचा विश्वास

काँग्रेसने तक्रार करूनही आयोग मोदींविरोधात कारवाई करत नसेल तर न्यायालयात जाण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने आयोगाने मंगळवारीदेखील मौन बाळगले.

२०१९ मध्येही मोदी-शहांविरोधात न्यायालयात धाव

गेल्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्यामधील प्रचारसभेत मोदींनी बालाकोटमधील हवाई हल्ला आणि पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत विधान केले होते. तसेच, भाजपचे तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार काँग्रसने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, आयोगाने तातडीने निर्णय न घेतल्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन नेत्या सुष्मिता देव व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान आयोगाने मोदी व शहांना निर्दोष ठरवले होते. या प्रकरणावरून केंद्रीय निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद झाल्याचे उघड झाले होते. तत्कालीन आयुक्त अशोक लवासा यांनी मोदी-शहांना निर्दोषत्व देण्यास विरोध केला होता.