Modi Government Updates : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा उलटून गेला आहे. या हल्ल्यामुळे भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच अमेरिकेने दोन्ही देशांना संघर्ष न वाढवण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आज चर्चा करतील असंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला एनआयए व इतर संरक्षण दलं काश्मीर खोऱ्यात पहलगाम हल्ल्याप्रकरणी तपास करत आहेत. २६ पर्यटकांना ठार मारून फरार झालेले दहशतवादी काश्मीर खोऱ्यात लपल्याचं सांगितलं जात आहे. एनआयएचा तपास, उभय देशांकडून एकमेकांवर होणारी कुरघोडी व त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे परिणाम या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बुधवारी (३० एप्रिल) पाच उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये काय चर्चा झाली, कोणते निर्णय घेण्यात आले, याविषयीची फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज याबद्दलची माहिती समोर येऊ शकते.

Live Updates

Pahalgam Terror Attack Live : पहलगाम हल्ला, त्यानंतर निर्माण झालेला भारत-पाकिस्तान तणाव आणि इतर राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

19:04 (IST) 1 May 2025

Amit Shah: "हे मोदी सरकार आहे, दहशतवाद्यांना वेचून…", गृहमंत्री अमित शाह यांचा सज्जड इशारा

Amit Shah on Terrorism: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. प्रत्येक अतिरेक्याला वेचून शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. ...अधिक वाचा
19:04 (IST) 1 May 2025

"मुस्लिमांना, काश्मिरींना लक्ष्य करू नका"; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचे आवाहन

Pahalgam Attack: पहलगाममधील बैसरन कुरणात दहशतवाद्यांना बळी पडलेल्या २६ जणांमध्ये हरियाणातील करनाल येथील २६ वर्षीय भारतीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता. ...अधिक वाचा
18:02 (IST) 1 May 2025

Farooq Abdullah: "दोन्ही देश लढाईसाठी…", भारत-पाकिस्तान युद्धाची चर्चा असताना फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान

Farooq Abdullah on India, Pakistan War: जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असताना यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले. तसेच राज्यातील अस्थिरतेवर भाष्य केले. ...वाचा सविस्तर
16:36 (IST) 1 May 2025

Supreme Court: पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं

Supreme Court on Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. ...वाचा सविस्तर
15:56 (IST) 1 May 2025

काश्मिरी शाल विक्रेत्यांना मारहाण प्रकरणी मसूरी पोलिसांकडून तिघांना अटक

उत्तराखंडमधील मसूरी शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ पाहून लोकांमधून संतापाची लाट उसळली होती. मसूरीत दोन काश्मिरी शाल विक्रेत्यांना काही लोकांनी शिव्या दिल्या व मारहाण करून हुसकावून लावलं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मसूरीमधील मॉल रोडवर हे काश्मिरी तरुण शाल विकत होते. मात्र, काही लोकांनी त्यांना मारहाण करत तिथून हुसकावून लावलं. त्यानंतर १६ काश्मिरी शाल विक्रेत्यांनी मसुरी सोडत देहरादुन गाठलं आहे. दरम्यान, मसूरी पोलिसांनी काश्मिरी शाल विक्रेत्यांच्या मारहाण प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

15:25 (IST) 1 May 2025

Muhammad Asim Malik : पाकिस्तानने ISI प्रमुखांवर का सोपवली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी? मुहम्मद असीम मलिक कोण आहेत?

आता पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. ...अधिक वाचा
13:20 (IST) 1 May 2025

'या' २१ देशात जाणं धोकादायक, अमेरिकेचा प्रवाशांना इशारा; यादीत भारताच्या शेजारी राष्ट्रांचा समावेश

USA Travel Advisory : जगभरातील अशा काही देशांची यादी अमेरिकेने जारी केली आहे जिथे त्यांच्या नागरिकांनी जाऊ नये असं ट्रम्प सरकारला वाटतं. ...सविस्तर बातमी
13:12 (IST) 1 May 2025

"आम्ही मध्येच अडकतो, काश्मिरी जनतेला भोगावं लागतं", पहलगाम हल्ल्याबाबत फारुख अब्दुल्लांचं वक्तव्य

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले, पहलगाममधील घटना खूप वेदनादायक होती. अशा घटनांमुळे समाजातील द्वेष वाढतो, दरी वाढते. लोकांमध्ये द्वेष पसरवणे हा कोणाचा हेतू आहे? ते लोक असं का करत आहेत? त्यातून त्यांना काय फायदा मिळणार आहे? हे आम्हाला माहिती नाही. मात्र आम्ही मात्र मध्येच अडकतो. गेल्या ३०-३५ वर्षापासून आम्ही हे सगळं पाहतोय. काश्मिरी जनतेला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

11:34 (IST) 1 May 2025

बलुचिस्तानमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन, संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाकिस्तानची कानउघडणी

Balochistan Violence : बलुचिस्तान प्रांतात संरक्षण दलांकडून हिंसा घडवली जात असून हत्येच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. ...अधिक वाचा
11:16 (IST) 1 May 2025

"मोदींकडे लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकार नाही", प्रकाश आंबेडकरांचा टोला; नेमकं काय म्हणाले?

Prakash Ambedkar on PM Modi : प्रकाश आंबेडकर म्हणाले, "भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर असतात, पंतप्रधान नव्हे. ...सविस्तर वाचा
11:02 (IST) 1 May 2025

Pahalgam Terror Attack: अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चेनंतर जयशंकर यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, "पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार…"

Marco Rubio - S Jaishankar Call: पहलगाम हल्ल्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवर चर्चा केली. ...सविस्तर बातमी
10:17 (IST) 1 May 2025

Pahalgam Attack : दहशतवाद्यांचं टूलकीट तपास यंत्रणांच्या हाती, सांकेतिक शब्दांपासून पोशाख व शस्त्रांसंबंधीची माहिती समोर

Pahalgam Terror Attack Toolkit : या टूलकिटमध्ये दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक सूचना, सांकेतिक शब्द, शस्त्रांस्रांची माहिती व नकाशे आहेत. ...सविस्तर बातमी
09:47 (IST) 1 May 2025

Lawrence Bishnoi : "अशा एकाला मारू, जो लाखाच्या बरोबरीचा असेल"; बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी? पोस्ट व्हायरल

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. ...वाचा सविस्तर
08:51 (IST) 1 May 2025

ट्रम्प यांच्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश महत्त्वाचे : व्हाइट हाऊस

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीरमधील परिस्थितीबाबत अमेरिका दोन्ही देशांशी संपर्क साधत त्यांना संघर्ष वाढवू नका असे आवाहन करत आहे. परराष्ट्रमंत्री रुबियो हे इतर देशांचे नेते आणि परराष्ट्रमंत्र्यांनाही दोन्ही देशांशी या मुद्द्यावर चर्चा करायला सांगत असल्याची माहिती ब्रुस यांनी दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश महत्त्वाचे आहेत असे ते म्हणाले.

08:46 (IST) 1 May 2025

भारत पाकिस्तान तणावावर सौदी अरबची प्रतिक्रिया

सौदी अरबच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत व पाकिस्तानला अंतर्गत तणाव करमी करण्याचं आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच चांगल्या शेजारधर्माचं पालन करून, आपापल्या देशातील लोकांच्या हितासाठी स्थिरता व शांततेसाठी प्रयत्न करावेत, असंही म्हटलं आहे.