रविवारी एक वर्ष पूर्ण केलेल्या भारताच्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. महासाथीच्या विरोधातील लढ्याला या मोहिमेने बळ दिले असून, तिच्यामुळे जीव वाचवण्यास आणि उपजीविकांचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.

 महासाथीचा पहिल्यांदा फटका बसला, त्या वेळी या विषाणूबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. तथापि, आमचे शास्त्रज्ञ व संशोधक यांनी लशी विकसित करण्यात स्वत:ला झोकून दिले. लशींच्या माध्यमातून महासाथीशी लढण्यात आमचा देश योगदान देऊ शकला याचा भारताला अभिमान आहे, असे ट्वीट मोदी यांनी केले.

first elections conducted using EVMs
EVM वापरून झालेल्या पहिल्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या रद्द, नेमके काय घडले होते?
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi
एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

 ‘लसीकरण मोहिमेशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो. आमचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची भूमिका असाधारण राहिलेली आहे’, असेही मोदी यांनी नमूद केले.

 ‘दुर्गम भागांत लोकांना लस दिली जात आहे, किंवा आमचे आरोग्य कर्मचारी तेथे लशी घेऊन जात आहेत अशी दृश्ये आम्ही पाहतो, तेव्हा आमची हृदये आणि मने अभिमानाने भरून येतात’, असे पंतप्रधान म्हणाले. महासाथीशी लढण्यात भारताचा दृष्टिकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.