जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स प्रकरणामुळे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने टाळल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या माहितीवरून याबाबतचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासात सर्वात मोठे ठरावे असे ‘पनामा पेपर्स’ प्रकरण जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह जगातील अनेक नामांकित माध्यमसमूहांनी उजेडात आणले होते. आपली मालमत्ता लपविण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा येथे कंपन्या स्थापन केलेल्या कंपन्यांशी निगडीत ५०० भारतीयांची नावे समोर आली होती. यात प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्याची सून ऐश्वर्या राय बच्चनचेही नाव पुढे आले होते. त्यामुळेच सरकारने सावध भूमिका घेत अमिताभ यांना अत्युल्य भारतचे ब्रँड अॅम्बेसिडर बलविण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. यामुळे पुढील कालावधीसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अतुल्य भारतची एकमेव ब्रँड अॅम्बेसिडर असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signing amitabh bachchan as brand ambassador of atulya bharat delayed sources
First published on: 18-04-2016 at 21:55 IST