केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत केलेले भाषण निखालस खोटे होते, असा हल्ला हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांनी शुक्रवारी चढवला.

स्मृतीजी, ही टीव्हीवरील मालिका नसून प्रत्यक्ष जीवन आहे. तुम्ही वस्तुस्थिती सांगा, गोष्टी रचून सांगू नका, असे रोहितची आई राधिका वेमुला हिने दिल्ली येथे सांगितले. रोहितचा भाऊ व त्याचे मित्र या वेळी हजर होते.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Liquor license also in the name of Mahayuti candidate Sandipan Bhumre wife
भुमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

रोहितच्या मृत्यूचे राजकारण करण्यात येत असल्याचे स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेतील भाषणात सांगितले होते. मात्र भाजपला अडचणीत आणणाऱ्या या मुद्दय़ावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी त्या खोटे बोलल्याचे रोहितचा भाऊ राजा म्हणाला.

आत्महत्येच्या काही दिवस आधी रोहितने विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात आपल्याविरुद्ध पक्षपात होत असल्याचे सांगून आपल्यासाठी ‘विष’ मागितले होते. या पत्राबाबत मंत्री जाणूनबुजून बोलत नसल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी केला.