नवी दिल्ली : देशातील निवडणुकीच्या राजकारणात समाजमाध्यमांचा दुरुपयोग केला जात असून समाजमाध्यमांचा लोकशाहीतील हस्तक्षेप थांबवला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष व खासदार सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केले. लोकसभेत बुधवारी शून्य प्रहरात सोनिया गांधी यांनी समाजमाध्यमांपासून लोकशाही असलेल्या धोक्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबुक, ट्विटर व तत्सम समाजमाध्यम कंपन्यांकडून भारतातील राजकारणात हस्तक्षेप केला जातो. या कंपन्या सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून या माध्यमांचा गैरवापर करत आहेत. देशातील लोकशाहीसाठी ही बाब धोकादायक असून हा गैरवापर केंद्र सरकारने थांबवला पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media stop interfering democracy sonia gandhi appeals central government allegations election fraud ysh
First published on: 17-03-2022 at 00:09 IST