लंडन : ‘‘काँग्रेसच्या इंग्लंडमधील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. आपल्या लंडन दौऱ्यादरम्यान ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या (आयओसी) कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी अनपेक्षितरीत्या सोनिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

 ‘आयओसी’च्या इंग्लंडमधील कार्यकर्त्यांची शनिवारी राहुल यांनी भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून पक्षविषयक बाबी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले. ‘आयओसी’चे इंग्लंडचे अध्यक्ष कमल धालिवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल यांना पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घेण्याचे आवाहन केले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या वेळी राहुल यांनी त्यांचा संपर्क दूरध्वनीवरून सोनिया गांधींशी करून देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. या वेळी सोनियांनी या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीतील विजयासाठी खूप मेहनत घेण्याचे आवाहन केले.

Solapur lok sabha seat, ram satpute, BJP Candidate, Mosques Issuing Fatwas, Vote for Congress, Fatwas Vote for Congress, Qazi Denies Accusations, praniti shinde, bjp, hindu muslim,
मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे; भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा आरोप
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना

या वेळी ‘आयओसी’च्या तेलंगणा समूहाचे सदस्य व प्रवक्ते सुधाकर गौड व सरचिटणीस गंपा वेणुगोपाल यांनी २०१४ मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती केल्याबद्दल सोनियांचे आभार मानले. त्या वेळी सोनियांनी तेलंगणमध्ये आगामी वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.

वैचारिक संघर्षांसाठी पक्ष सज्ज- राहुल गांधी

या वेळी राहुल गांधी यांनी भारतात वैचारिक संघर्षांसाठी पक्ष सज्ज झाल्याचा पुनरुच्चार करून, आपण कोणत्याही एका राजकीय संस्थेशी संघर्ष करत नसून, विघातक विचारधारेशी आपला संघर्ष आहे. तसेच देशातील घटनात्मक संस्थांच्या रक्षणासाठीही आपण लढत आहोत, असे सांगितले.