Indian Railway News: भारतातील बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेलाइन आहेत. त्याच वेळी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी रेल्वे स्थानके बांधण्यात आली आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानके आहेत. अनेक राज्यांमध्ये शेकडो रेल्वे स्थानके आहेत, पण तुम्हाला माहित आहे का देशात एक असे राज्य आहे जिथे एकच रेल्वे स्टेशन आहे.

राज्यात दुसरे रेल्वे स्थानक नसल्यामुळे रेल्वेने प्रवास करावा लागणारे सर्व लोक या रेल्वे स्थानकावर पोहोचतात. सामान्यतः असे म्हटले जाते की हे शेवटचे रेल्वे स्थानक आहे, या रेल्वे स्टेशननंतर रेल्वे लाइन संपते. अशा परिस्थितीत कोणतीही ट्रेन इथं पोहोचते ती माणसं आणि सामान आणण्यासाठीच जाते.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

कोणत्या राज्यात हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे

भारताच्या पूर्व टोकाला असलेले मिझोराम हे असे राज्य आहे, जिथे एकच रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव बइराबी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनच्या पुढे कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. येथून प्रवाशांबरोबरच मालाचीही वाहतूक केली जाते.

( हे ही वाचा; सर्व रेल्वे रुळांवर दगड टाकले जातात पण रेल्वे स्टेशनजवळ का नाही? यामागचे कारण जाणून थक्क व्हाल)

4 ट्रॅक आणि 3 प्लॅटफॉर्म

बइराबी रेल्वे स्थानक सर्वसाधारणपणे बांधलेले असून त्यात अनेक आधुनिक सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्थानकाचा कोड BHRB आहे आणि हे तीन प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी चार ट्रॅक आहेत.

स्टेशनचा पुनर्विकास करण्यात आला आहे

पूर्वी हे फक्त एक लहान रेल्वे स्थानक होते, जे नंतर २०१६ मध्ये एका मोठ्या रेल्वे स्थानकात बदलण्यासाठी पुनर्विकास करण्यात आले. यानंतर त्यावर अनेक सुविधा वाढवण्यात आल्या. येत्या काळात याठिकाणी आणखी एक रेल्वे स्थानक बांधण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.