Harshwardhan Jadhav : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली आणि त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. २३ नोव्हेंबरच्या निकालात महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. यानंतर या निकालांमध्ये काहीतरी गडबड आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी संख्येबाबत सविस्तर पोस्ट लिहून फरक विचारला आहे. तर दुसरीकडे एका माजी आमदाराने विधानसभा निवडणूक निकाल ईव्हीएम घोटाळायुक्त आहे असा आरोप केला आहे.

महायुतीतल्या कुठल्या पक्षांना किती मतं मिळाली

भाजपा -१३२ आमदार
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४१ आमदार
मित्रपक्ष -९ आमदार

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”

अशा एकूण २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट आहे. दरम्यान कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ( Harshwardhan Jadhav ) यांनी ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असल्याचं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Jitendra Awhad on EVM: “मतदान झालं ३१२, मतमोजणीत निघाले ६२४”, जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी

काय म्हटलं आहे अविनाश जाधव यांनी?

कन्नडची निवडणूक आणि त्या ठिकाणी झालेली मतमोजणी याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच प्रश्न या मतदार संघातही आहेत. ईव्हीएम संदर्भातल्या प्रश्नांसाठी मी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. येत्या काळात ईव्हीएमच्या संदर्भात अनेक गोष्टी आगामी काळात समोर येतील. कारण अनेक गोष्टी या मानवी चुका झाल्या आहेत म्हणून समोर येत आहेत. आमचं लिहितांना चुकलं आणि दुरुस्त केलं हे पुढे येतं आहे. मतदानाच्या दिवशी मोजणी सुरु असताना जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली ती नेमकी वाढली कशी? त्यावर हे उत्तर देण्यात आलं की सुरुवातीच्या संख्या चुकल्या होत्या आणि आम्ही त्या आता दुरुस्त केल्या. निवडणूक आयोगाकडून संख्या देताना इतका हलगर्जीपणा कसा होतो? हा पोरखेळ झाला आहे. असं हर्षवर्धन जाधव यां ( Harshwardhan Jadhav ) नी म्हटलं आहे.

ईव्हीएम घोटाळायुक्त निवडणूक आणि निकाल

“येत्या काही दिवसांमध्ये राज्यात हे प्रश्न चर्चेत येतील. ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असलेली निवडणूक आहे. ह्युमन एररचं कारण सांगितलं जातं आहे जे असू शकत नाही. कारण हा निवडणूक आयोग आहे. चौपाटीवर बसून चूक झाली असं सांगण्यात येण्याइतकं सोपं नाही. घोटाळा कुठे झाला हे शोधावं लागेल. ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त निवडणूक असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे.” असंही हर्षवर्धन जाधव ( Harshwardhan Jadhav ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader