देशात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या मंत्र्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत देशात २६९ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ७,३८३ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, याच काळात सहा कोविड रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
नऊ मृत्यूंपैकी केरळमध्ये तीन, कर्नाटकमध्ये दोन आणि महाराष्ट्रात एकाचा मृत्यू झाला. एक बळी ४३ वर्षांचा होता आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होती. इतर वृद्धांमध्ये श्वसन आणि दीर्घकालीन आजार होते. संसर्गातील वाढीसाठी LF.7, XFG, JN.1 आणि अलीकडेच ओळखल्या गेलेल्या NB.1.8.1 या नवीन प्रकारांना जबाबदार धरले जात आहे.
सरकारच्या सूचना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत जनतेसाठी कोणताही नवीन सल्ला जारी केलेला नाही. तरीही गेल्या काही आठवड्यात अनेक भारतीय राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यामध्ये लोकांना शांत राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या कोविड प्रकरणांना प्रतिसाद म्हणून कर्नाटक सरकारने जनतेला प्रसार रोखण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. २३ मे रोजी दिल्ली सरकारने वाढत्या कोविड प्रकरणांना तोंड देण्यासाठी रुग्णालयात पुरेसे बेड, ऑक्सिजन, औषधे आणि लसींसह सज्ज आहेत का याची खात्री करण्यासाठी एक सूचना जारी केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचे यावेळी सांगितले. “काळजी करण्याची गरज नाही. दिल्ली सरकार सतर्क आहे आणि रुग्णालये कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत,” असे त्या म्हणाल्या.
ओडिशामध्ये आरोग्य सचिव अश्वथी एस यांनी जनतेला आश्वासन दिले की, सर्व कोविड रुग्ण स्थिर आहेत आणि नागरिकांना त्यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. “आयसीएमआरच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या प्रकारात गंभीर लक्षणे दिसत नाहीत आणि बहुतेक प्रकरणे साधारण आहेत. तसेच केंद्राने कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत, मात्र बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे”, असेही त्या म्हणाल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये राज्य देखरेख अधिकारी लोबसांग जम्पा यांनी रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले, कारण आता आढळलेला विषाणू मागील प्रकारांपेक्षा सौम्य दिसत आहे.
“ प्रत्येक राज्यातील आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे”, असेही ते पुढे म्हणाले.
- महत्त्वाचे मुद्दे:
- ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, इतर आजार असलेले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक
- हाताची स्वच्छता पाळा आणि गर्दीच्या ठिकाणी टाळा
- मच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही बूस्टर लस घ्यावी
- रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कोविड लस घेतल्याने मूत्रपिंडाचे नुकसान किंवा मूत्रपिंडाशी संबंधित इतर कोणत्याही गंभीर समस्येचा धोका कमी होतो
तज्ज्ञ काय म्हणत आहेत?
तज्ज्ञांनी मास्क घालणे, हातांची स्वच्छता राखणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे यांसारखे कोविडयोग्य वर्तन राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना पाठवल्या आहेत, तसंच तयारी आणि दक्षतेवर भर दिला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड-१९ ला इतर विषाणूजन्य तापांपासून वेगळे करण्याची गरज अधोरेखित केली आहे; ज्यामध्ये ताप, थकवा आणि श्वसनाच्या समस्या यांसारखी लक्षणे दिसतात