गळ्यात गळा  घालणारे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात कायमचे अंतर पडल्याने आता ते एकमेकांवर वार  करण्यास सज्ज झाल्याने दोन शेतकरी नेत्यांतील राजकीय संघर्ष लक्ष्यभेदी ठरणार आहे . त्यांच्यातील राजकीय लढ्याचा खरा कस शेट्टी – खोत यांचे मूळचे कार्यक्षेत्र असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात लागणार आहे . एकमेकांची जिरवण्याच्या राजकीय खेळींना आता ऊत येण्याची चिन्हे आहेत.

ज़िल्हा परिषदेच्या निवडणुकीतील ’अडवा आणि जिरवा ’ या धोरणाचा फटका बसलेले सदाभाऊ आता भाजपच्या वळचणीला गेले आहेत . भाजपच्या मदतीआधारे शेट्टी यांना मात  देण्याचा डाव रचला जाणार , हे उघड . एकदा गल्लीत जिरली कि दिल्लीत पोहचण्याची काय बिशाद ,अशी चाल खेळली जाणार आहे . याउलट सदाभाऊ यांची जनमानसातील ताकद काय हे दाखवून उघडे पाडण्याचे डावपेच स्वाभिमानीच्या छावणीत रचले जात आहेत . लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत जाईल तसतसे या  निमित्ताने राजकारणाचा हा नवा सारीपाट आकाराला येत जाईल .

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
BJPs charsau paar slogan is a conspiracy to change the constitution MLA Praniti Shinde alleges
भाजपचा ‘चारसौ पार’चा नारा म्हणजे संविधान बदलण्याचे कारस्थान, आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप
Right of primary teachers to participate in active politics
‘प्राथमिक शिक्षकांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार’
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दोघा  मित्रांच्या मत्रीच्या कथा आजवर खूप ऐकवल्या गेल्या . निष्कांचन अवस्थेतही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी तत्कालीन सत्ताधारी , साखर सम्राट यांना जेरीला आणल्याचा  कहाण्या आता अनेकदा वाचून – ऐकून  झाल्या . केंद्रात आणि राज्यात सत्तांतर करण्यासाठी आपल्यापरीने योगदान देणारया या मित्रांची राजकीय सोयही झाली . शेट्टी खासदार व खोत मंत्री झाले . पुढे खोत यांचे मंत्रिपदाच मत्रीच्या ठिकर्या उडवण्यास कारणीभूत ठरले .  शेट्टी – खोत यांचा दोस्ताना आता दुष्मनीत बदलला आहे . केवळ बदलला आहे असे नव्हे तर एकमेकांचे उट्टे काढण्याचे राजकारण नजीकच्या काळात वाढीस लागणार आहे. त्याचे पहिले मोठे कुरुक्षेत्र  हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असणार आहे .

शेट्टींना गल्लीतच रोखण्याचा डाव

सत्ता केंद्रातील असो कि राज्यातील राजू शेट्टी सत्तेचे वाटेकरी आहेत . पण गेल्या वर्षभरापासून त्यांनी मोदींपासून ते फडणवीसपर्यंत जाहीरपणे टीकेची तोफ डागण्यास सुरुवात केली आहे . यामुळे शेट्टी यांच्यावर सत्ताधारी थेटपणे टीका करण्याचे टाळत  असले तरी त्यांचा समाज माध्यमाचा चमू शेट्टींचे वाभाडे काढताना दिसत आहे . याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत  शेट्टी यांना दिल्लीला पाठवण्याऐवजी गल्लीतच मार्ग रोखण्याची खेळी रचली जाणार . अशावेळी शेट्टी यांना नामोहरण करण्यासाठी खोत यांच्या बुलंदी टीकेची तोफ कामी येणार आहे . शेट्टी यांचा सहवासात राहिल्यानंतर त्यांचे दोष हे खोत यांना माहिती आहे . या माहितीच्या आधारे शेट्टी यांची प्रतिमा मलीन केली जावू शकते . सध्या सत्ताधारी पक्षाचे उघड वाभाडे काढणारे विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत . त्यात शेट्टी यांचा क्रम वरचा आहे .हि बाब  भाजपला पचनी पडणारी नसल्याने लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांना रोखण्यासाठी भाजप व मित्रपक्षांची पुरेपूर ताकद वापरली जाण्याची चिन्हे आहेत .

खोत यांना अनुल्लेखाने टिपणार

शेट्टी यांच्या विरोधात सदाभाऊंची उखळी तोफ धडाडणार असली तरी ते शेट्टी यांच्याच पथ्यावर पडेल , असा सूर स्वाभिमानीतून व्यक्त होत आहे . खोत  यांच्याकडे वक्तृत्व असले तरी जनाधार नाही . हे बागणी  जिल्हा परिषदेत मंत्रीपुत्राच्या पराभवातून दिसले आहे . त्यामुळे त्यांनी टीकेचा मारा वाढवला तरी शेट्टी यांची प्रतिमा मालिन होण्याऐवजी सहानुभूती मिळेल, असे स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी ’लोकसत्ता’ला  गुरुवारी सांगितले . गेल्या निवडणुकीत सारे सहकार सम्राट एका सुरात  शेट्टी यांच्या विरोधात टीका करीत होते पण शेतकरी चळवळीला  वाहून घेतलेल्या शेट्टी यांचाच विजय झाला हे नाकारता कसे  येईल, याकडे त्यांनी लक्ष  वेधले . मुळात स्वाभिमानाने खोत यांना महत्व न देता अनुल्लेखाने मारण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले .

मंत्रिपदाला आव्हान?

गेल्या आठवड्यात शेट्टी यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली . त्यात नेमके काय घडले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून काही मुद्देही पुढे आले आहेत . स्वाभिमानीने शेट्टी – खोत वाद वाढू लागल्यावर  खोत यांच्या मंत्रिपदाला  आव्हान दिले होते . हा मुद्दा भाजपाला विचार करायला लावणारा आहे .  जनाधार असणारया शेट्टी यांना जवळ करायचे कि बुलंदी मारा करणारया खोत यांनी कंपूत ठेवायचे हा हि भाजपाला प्रश्न पडू शकतो . यातून थेट खोत यांच्या मंत्रिपदाचा हात घालण्याची खेळी स्वाभिमानीकडून रचली जाऊ शकते.