scorecardresearch

Premium

कोल्हापूर :साखर कारखानांच्या दारात २२ दिवस आत्मक्लेश पदयात्रा; ७ नोव्हेंबरला ऊस परिषद – राजू शेट्टी

ऊस गाळपासाठी प्रतिटन ४०० रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला हात घातला आहे

atmaklesh yatra for 22 day at the gates of sugar mills says raju shetty
राजू शेट्टी

गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन ४०० रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला हात घातला आहे. या मागणीसाठी साखरकारखानदारांच्या दारात पायी जाऊन २२ दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन ते १७ ऑक्टोबर पासून सुरू करणार आहेत. तर यावर्षीचा ऊस परिषद जयसिंगपूर येथे ७ नोव्हेंबरला होणार आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन

protest against sugar factory kolhapur
कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा
Raju Shetty allegation
शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये न मिळण्यास राज्य शासन जबाबदार; राजू शेट्टी यांचा आरोप
swabhimani farmers organization
साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

याबाबत सोमवारी येथे शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या हंगामात साखर दरवाढ, इथेनॉल यापासून चांगले उत्पन्न मिळाले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे उतारा घातल्याने एफआरपी मध्ये घट झाली आहे.  यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी अधिक प्रति टन ४०० रुपये द्यावेत अशी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देणारे निवेदन दिले होते. यामुळे स्वाभिमानीच्या वतीने १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या दारात आंदोलन केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ४००  रुपये अधिक देऊन दर देता येणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र कोल्हापूर, सांगलीतील कारखानदारांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने हे आंदोलन केले जाणार आहे.

आजपासून साखर अडवणार

कर्नाटकात स्वाभिमानी व रयतु संघटना यांच्या वतीने १० ऑक्टोबर पासून हे आंदोलन केले जाणार आहे. उद्यापासून साखर कारखान्या मधून बाहेर पडणारी साखर आणि उपपदार्थ अडवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Atmaklesh yatra for 22 day at the gates of sugar mills says raju shetty zws

First published on: 02-10-2023 at 18:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×