कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी कारवाईची मोहीम सुरु केली. या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला आहे. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलिसांबरोबर हुज्जत घातली. याप्रकरणी मदरसा व्यवथापनाच्या अपिलावर २ फेब्रुवारी रोजी सुनावणी असताना त्यापूर्वीच कारवाई का केली जात आहे, असा सवाल करण्यात आला. कारवाई वेळी नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने गोंधळात भर पडली. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केले असले तरी या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

काळजीपूर्वक हालचाली

अंजुमन मदरसा व सुन्नत जमात लक्षतीर्थ वसाहत ठिकाणी कारवाई हाेऊ नये यासाठी परिसरात माेठा जमाव जमा झाला होता. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढल्याने पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात १४४ कलम लागू केले आहे. या परिसरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. ओळखपत्र आहे त्यांनाच वसाहतीमध्ये साेडले जात आहे.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारीची दोन्ही मतदारसंघांत उत्सुकता वाढली

हेही वाचा – कोल्हापुरात महालक्ष्मी विकास आराखड्यावर अजित पवारांच्या भूमिकेवरून संतप्त भावना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाई पुढे ढकलावी

दरम्यान लक्षतीर्थ वसाहत शांतता कमिटीने सदरची कारवाई पुढे ढकलावी अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासन यांना दिले आहे. या मदरसाविषयी या भागातील व्यक्ती व समाजाची कोणतीही तक्रार नाही. बाहेरील व्यक्ती व संघटनेच्या तक्रारीवर कारवाई होत आहे. यामुळे अतिक्रमण कार्यवाहीस मुदत वाढ मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, युवराज खंडागळे यांच्यासह शांतता कमिटी सदस्यांनी केली आहे.